हक्क!

मुंबईत झालेल्या घटनांनी सुन्न व्हायला झालं. अतिशय थंड डोक्याने कोणी इतक्या जणांना मारायची योजना बनवु शकतो ती प्रत्यक्षात आणु शकतो हे झेपणंच जड गेलं. मुंबईकर त्याच्या स्वभावधर्मानुसार वागले. कोणी आपल्या कामाचं नाही हे त्यांना चांगलं माहीत आहे. त्यांनीच एकमेकांचे अश्रु पुसले आणि चालु लागले. कोणत्याही युद्धात बळी पडतात ते निरपराध असहायच!
मला तर कधी कधी समजत नाही की ह्यांचं कौतुक करावं की त्यांनी काही किमान अपेक्षा बाळगु नये या बद्द्ल रागवावं
ह्यातुन सवरते आहे तोच लक्षात आले की आपला ब्लॉग चालत नाहीये. आधी वाटले की व्यत्यय आहे पण मग खरी गोष्ट समजली. हा म्हणजे चोर सोडुन सन्यासाला सुळी देण्याचा प्रकार! `आविष्कार स्वातंत्र्याची मुस्कटदाबी' आहे ही! जाम वैतागले मी. मला पोस्ट करता येत आहे कारण ते संकेतस्थळ वर्ज्य नाही झालेले पण वाचता येत नाही. तणतणुन "वर्ड्प्रेस" ला हलायचा विचार केला. पण एक मिनिट.... का म्हणुन? का म्हणुन मी हलायचे इथुन? नोहे! नो वे!
तेंव्हा रामगढ के वासियों चाहे गब्बर कुछ भी करले ... जब तक है मुमकिन, मै ब्लॉगुंगी!!!
तुमचा लोभ असावा ही विनंती!

Comments

Milind said…
अच्छा, तुमची खेळी झालीय हे माझ्या लक्षातच आले नाही. तसदीबद्दल क्षमस्व :)

Popular posts from this blog

पुस्तकांच्या आठवणी

बागेश्री १

हाक