दिल चीज क्या है?

सुमेधाच्या उमरावजान ह्या नोन्दीमुळे मनात आलेले काही विचार,
ह्या चित्रपटाने तीन स्त्रियांना पुन:प्रसिद्धी मिळवुन दिली.
उमरावजान स्वत:(ती एक कल्पनिक स्त्री का असेना...), रेखा आणि आशा भोसले. या तिघींच्या कौशल्याची एक नवीन मिती dimensionचाहत्यांसमोर आली. उमरावजानची एक संवेदनाशील कवयित्री म्हणून एक नवीन ओळख झाली. ऱेखाच्या अभिनयसामर्थ्याची पेहचान झाली. आशाजींचा मधाळ आवाज आपल्या चाकोरीबाहेर पडुन खय्याम यांच्या संगीतातुन खानदानी अत्तरासारखा दरवळला. या तिघी नाजनीन अहेत, divaआहेत. आणि या तिघीही विरहिणी अहेत, अश्या जोडीदाराच्या शोधात जो जन्माची साथ देइल. ज़ो मध्येच डाव सोडुन उठुन नाही जाणार... तिघींना जणु एकच प्रश्न पडलाय,
हर मुलाकात का अंजाम जुदाई क्युं है
अब तो हर वक्त यही बात सताती है हमें....

Comments

TheKing said…
Kyaa baat hai!!

Popular posts from this blog

पुस्तकांच्या आठवणी

बागेश्री १

हाक